Thursday, 4 July 2024
परंडा येथे " संपूर्णता अभियान " चा उत्साहात शुभारंभ
परंडा येथे " संपूर्णता अभियान " चा
उत्साहात शुभारंभ
धाराशिव दि.04 (जिमाका) नीती आयोगाने आकांक्षित जिल्हा म्हणून धाराशिवचा समावेश केला आहे.त्याअंतर्गत परंडा तालूका हा आकांक्षित तालूका म्हणून घोषित केला आहे.परंडा तालुक्यातील काही निर्देशांकात सुधारणा करण्याकरिता ४ जुलै २०२४ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीमध्ये “ संपूर्णता अभियान “ राबविण्यात येणार आहे.
संपूर्णता अभियानचा जिल्हास्तरीय उदघाटन कार्यक्रम आज ०४ जुलै २०२४ रोजी परंडा येथील राजधानी मंगल कार्यालय येथे जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांचे हस्ते करण्यात आला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ.मैनाक घोष हे अध्यक्षस्थानी होते.
उदघाटन कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे,जिल्हा आरोग्य अधीकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला,जिल्हा नियोजन अधिकारी प्रवीण झाडे,गट विकास अधिकारी श्री.नागटिळक,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनयशील कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.विश्वेश कुलकर्णी व तालुकास्तरीय अधिकारी,कर्मचारी, आशा स्वयंसेविका वअंगणवाडी कार्यकर्ती मोठ्या संख्येने उपास्थित होत्या.
परंडा तालुक्यातील बचत गटांमार्फत या उद्घाटन कार्यक्रमामध्ये विविध वस्तूंची विक्री करण्यात आली.आरोग्य विभागाकडून आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.नागरिकांचे व अधिकारी कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी (रक्त दाब, शुगर तपासणी ) करण्यात आली.
आरोग्य विभागामार्फत परांडा शहरात शालेय विद्यार्थी यांची जनजागृती प्रभात फेरी काढण्यात आली.संपूर्णता अभियानात आरोग्य,महिला व बाल कल्याण,शिक्षण, कृषी,सामाजिक विकास या विभागाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ठराविक निर्देशंकात माहे सप्टेंबर २०२४ अखेर १०० टक्के उदिष्ट साध्य करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी यावेळी कार्यक्रमातून निर्देश दिले.



