Thursday, 23 February 2017

जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2017 उस्मानबाद जिल्हयाचा निकाल जाहीर


       उस्मानाबाद, दि.23:- जिल्हा  परिषद  पंचायत  समिती  सार्वत्रिक  निवडणूक 2017 चा उस्मानाबाद  जिल्हयाचा  निकाल निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आज जाहीर केला.
          उस्मानाबाद जिल्हा परिषदेकरिता एकूण 55 जागांकरिता विविध पक्षाच्या एकूण 257 उमेदवारांमध्ये चुरस होती. त्यापैकी उस्मानाबादच्या  जनतेने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या26,शिवसेना पक्षाच्या11, कॉग्रेस पक्षाच्या 13,भारतीय जनता पक्षाच्या 4, भारतीय  परिवर्तन सेनेचा 1 अशा उमेदवारांना  या  निवडणुकीत  निवडून  दिले आहे.
          त्याचप्रमाणे उस्मानाबादमधील 8 तालुक्यातील पंचायत समितीकरिता  एकूण 110 जागांकरिता  एकूण 477 उमेदवारांमध्ये चुरस होती.
          यामध्ये उस्मानाबाद पंचायत समितीच्या 24 जागांकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या 16,भारतीय कॉग्रेस पक्षाच्या 2,शिवसेनेच्या 3 तर भारतीय जनता पक्षाच्या 3 उमेदवारांना निवडून येण्यात यश मिळाले आहे.
          परंडा पंचायत समितीच्या 10 जागांकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या 07, शिवसेनेच्या 02 तर भारतीय जनता पक्षाच्या 01 उमेदवाराला निवडून येण्यात यश मिळाले आहे.
वाशी पंचायत समितीच्या 6 जागांकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या 02,भारतीय कॉग्रेस पक्षाच्या 02,शिवसेनेच्या 02 उमेदवारांना निवडून येण्यात यश मिळाले आहे.
कळंब पंचायत  समितीच्या 16 जागांकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या 10, शिवसेनेच्या 06 उमेदवारांना निवडून येण्यात यश मिळाले आहे.
 लोहारा पंचायत समितीच्या 8 जागांकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या01,भारतीय कॉग्रेस पक्षाच्या 05 तर भारतीय जनता पक्षाच्या 02 उमेदवारांना निवडून येण्यात यश मिळाले आहे.
उमरगा पंचायत समितीच्या 18 जागांकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या 04,भारतीय कॉग्रेस पक्षाच्या 09,शिवसेनेच्या 02 तर भारतीय जनता पक्षाच्या 03उमेदवरांना निवडून येण्यात यश मिळाले आहे.
भूम पंचायत समितीच्या 10 जागांकरिता  राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाला 05, भारतीय कॉग्रेस पक्षाच्या 01,शिवसेनेला 03 तर भारतीय जनता पक्षाच्या 01 उमेदवारांला निवडून येण्यात यश मिळाले आहे.
तुळजापूर पंचायत समितीच्या 18जागांकरिता राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या 06,भारतीय कॉग्रेस पक्षाच्या 11, तर भारतीय जनता पक्षाच्या 01 उमेदवाराला निवडून येण्यात यश मिळाले आहे.

मतदान मोजणीच्या ठिकाणी कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी जिल्हा  प्रशासनाकडून योग्य तो  बंदोबस्त  ठेवण्यात  आला होता. कोठेही  अनुचित  प्रकार  न घडता  मतमोजणी  शांततेत  पार  पडली. विजयी  उमेदवारांचे  प्रशासनामार्फत  अभिनंदन  करण्यात  आले.